वेतनात 25 टक्के वाढ, आठवड्यातील पाच दिवसच काम
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) यांच्याकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एकाच दिवसात दोन खुशखबर दिल्या आहेत. एलआयसीच्या जवळपास 1.14 लाख कर्मचाऱयांसाठी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्रीकांत मिश्रा यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये जवळपास 25 टक्क्यांनी वाढ केल्याचे म्हटले आहे. या घोषणेमुळे कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एलआयसी कर्मचाऱयांसाठी वेतनवाढी संदर्भासह एलआयसी कर्मचाऱयांना आता आठवडय़ामधील पाच दिवस काम करावे लागणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
युनियनच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार एलआयसीच्या इतिहासामध्ये ही प्रथम संधी दिली आहे, ज्यामध्ये वेतन सुधारणेस इतका उशीर झाला आहे. मिश्रा यांच्या माहितीनुसार मॅनेजमेंटने मागणी केली तेव्हा 40 टक्क्याची वेतन वाढ केली होती. परंतु या अगोदर मिश्रा यांनी म्हटले आहे, की 10 टक्के वेतन वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱया राउंडमध्ये ही वाढ होत 15 टक्के केली होती.
पाच दिवस काम करण्याची संधी
एलआयसी कर्मचाऱयांसाठी एलआयसीने आपल्या नियमावलीत काही बदल केले आहेत. नवीन नियमावलीनुसार केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आठवडय़ातील पाच दिवसच काम करण्याचा नियम एलआयसीने केला आहे. यामुळे आता येत्या काळात एलआयसी कार्यालयांना शनिवारी रविवार सुट्टी राहणार आहे. सरकारने हा बदल नेगोशिएबल इंस्टुमेंट्स कायदा 1881 कलम 25 नुसार हा बदल करण्यात आल्याची माहिती आहे.