मुंबई
कोरोना काळात भारतीय शेअर बाजाराने उत्तम कामगिरी निभावली आहे. या काळात अनेक कंपन्यांनी चांगला परतावा दिल्याचे दिसले आहे. एलकॉन इंजिनियरिंग या कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. एका गुंतवणूकदाराच्या मते, सदरच्या समभागाने वर्षभरात 315 टक्के इतका परतावा दिला आहे. एलकॉनने गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत 170 टक्के परतावा दिला आहे. 42 रुपयांवर असणारा भाव 175 रुपयांवर चढला आहे.