सातारा आगारासह जिह्यातील 11 आगारातील सर्व फेऱया रद्द
प्रतिनिधी/ सातारा
राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांनी राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळास विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी संप पुकारला आहे. या संपात सातारा विभागातील सातारा आगारासह 11ही आगार सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. एसटी बंद असल्याचा गैरफायदा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱया वडाप चालकांनी घेतला अन् दिवाळी साजरी केली. राजकीय संघटना पक्षाच्या पदाधिकाऱयांना पाठींबा देवून आंदोलनकर्त्यांच्या पुढे भाषणबाजी करत पाठींबा दर्शवला.
जिह्यातील सातारा, वाई, फलटण, पाटण, कराड, मेढा, दहिवडी, वडूज, कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा अशा अकरा आगारामध्ये सकाळपासूनच काम बंद आंदोलनात कर्मचाऱयांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक आगारातील कर्मचाऱयांनी आगारात, विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलन करुन जोरदारपणे घोषणा करुन निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनाची जिह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना व मुंबई, पुण्याला जाण्याचा बेत आखलेल्यांची चांगलीच गैरसोय झाली.
विभागीय नियंत्रक पळसुले यांनाही रोखले
सकाळी कार्यलयीन वेळेप्रमाणे विभागीय नियंत्रक सागर पळसुले हे विभागीय कार्यालयात आले. त्यावेळी त्यांना गेटवरच ठिय्या मारुन बसलेल्या कर्मचाऱयांनी रोखत साहेब आत नाही जायचे. दार उघडणार नाही. असे म्हणत टाळा लावला. त्यावेळी पळसुले यांनी मी तुमच्यातीलच एक एसटी कर्मचारी आहे, असे सांगताच त्यांना टाळा खोलून आतमध्ये सोडले परंतु साहेबही काही वेळाने परत निघून गेले.
सातारा आगारातील लिपिकांना काम बंद करायला भाग पाडले
सगळय़ा आगारातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. आणि दुसऱया बाजूला सातारा आगारातील काही कर्मचारी हे कर्मचाऱयांचे वेतन काढण्याचे काम करत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना मिळाली. त्यांनी तेथे जाताना गोंधळय़ास नेले अन् त्यांच्यासमोर वाजवत काम बंद ठेवण्याची विनंती करताच त्यांनी काम बंद ठेवतो असे सांगून काम बंद ठेवले.
आगारप्रमुखांनाही घेतला सहभाग
प्रशासन म्हणून संप होवू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱया एसटीमधील अधिकाऱयांचा समावेश असतो. परंतु सातारा आगारातील कर्मचाऱयांची आक्रमकता पहाता आगारप्रमुख रेश्मा गाडेकरांना या संपात सहभागी व्हावे लागले. त्यांनी केबीनमध्ये न जाता कर्मचाऱयांच्या सोबत राहिल्या.
स्वारगेट 500, मुंबई 100 रुपये
ऐवीतेवी रात्रीच्या खाजगी बसेस स्टॅण्डच्या परिसरात लागतात. त्यांचे एजंट स्टॅण्डमधून प्रवाशांना बोलवून नेतात. पंरतु आज सकाळपासून खाजगी बस चालकांचे एजंट आतमध्ये प्रवाशी दिसला की त्याच्या मागे लागत होते. स्वारगेट, मुंबई असे पुकारत होते. तिकीट विचारताच काही ट्रव्हल्सवाले 500 तर काही ट्रक्हल्सवाले 300 सांगत होते. खचाखच भरुन वडापची वाहतूक जोरात सुरु होती.
ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय
रात्री मुक्कामी गेलेल्या बसेस सकाळी परत आल्या. गावांकडच्या नागरिकांना संप असल्याचे माहिती नव्हते. ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही परंतु शहरात कोणाचे डॉक्टरकडे, वकीलांकडे काम असल्याने सकाळच्या गाडीने शहरात पोहचताच एसटीचा संप असल्याचे ज्ञात होताच परत जायचे कसा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. तर काहींनी वडाप जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जावून तेथून पुढचा प्रवास करण्यासाठी कोणी दुचाकी मागवली तर कोणी पायी चालत गेल्याचे सांगण्यात येत आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत 30 लाखांचा तोटा
बंद ठेवण्यात आलेल्या एसटी बसमुळे सर्वच आगारातील एसटी बसेस बंद होत्या. त्यामुळे जिह्यात दुपारी 745 फेऱया रद्द करण्यात आल्या होत्या. 98 हजार757 किलोमीटरवरील मार्गिंका बंद होत्या. 30 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. तर सांयकाळी उशीरापर्यंत 50 लाखापर्यंतचे उत्पन्न बुडाले होते.