प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये शुक्रवारी एसटीच्या 360 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े तब्बल 146 चालक वाहक कामावर हजर झाल्याचे एसटीकडून सांगण्यात आले आह़े
जिह्यात आता एकूण 722 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ दरम्यान एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात सोमवारी 350 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल्याचे एसटीच्या अधिकाऱयांनी सांगितल़े राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ असे असले तरी चालक वाहक कामावर हजर रहावेत यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी पर्यंत्न करण्यात येत आहेत़
दरम्यान कोरोना रूग्णांची संख्या आता वाढत असताना लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱयांचा संप शासनाच्या पथ्यावर पडू शकत़ो मात्र मागील दोन महिन्यांपासून चालणाऱया संपामुळे ग्रामीण भागातील जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागल़ा तर खासगी वाहतूकदार हे वाढीव दर आकारत असल्याने नुकसान देखील सहन करावे लागल़े