प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱयांचे निलंबन व पक्षाची आंदोलनाबाबतची भूमिका या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कर्मचाऱयांशी चर्चा करण्यात आली. रत्नागिरी विभाग नियंत्रकांची भेट घेऊन प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरी मनसेच्यावतीने (दक्षिण) जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सलग दुसऱया दिवशी मनसे पदाधिकाऱयांनी माळनाका येथील आंदोलनस्थळी भेट दिली. पक्ष आंदोलन तडीस जाईपर्यंत सोबत असेल, अशी ग्वाही चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, कामगार सेना चिटणीस छोटू खामकर, तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर, शहराध्यक्ष सतीश राणे, उपतालुकाध्यक्ष राजू पाचकुडे, विभाग अध्यक्ष उल्हास देसाई उपशहराध्यक्ष अमोल श्रीनाथ, मयुरेश मडके, गौरव चव्हाण, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, अक्षय माईन आदी उपस्थित होते.
…