रत्नागिरी विभागाने कामगार न्यायालयात दिली होती तक्रार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून एसटी कर्मचाऱयांविरूद्ध दाखल तक्रारीची 24 जानेवारी रोजी कामगार न्यायालयात सुनावणी झाल़ी यावेळी सिंधुदुर्गमधील एसटी कामगार संघटनेकडून आपली बाजू न्यायालयात सादर करण्यात आल़ी दरम्यान आता या तक्रारीची पुढील सुनावणी 7 फेबुवारी रोजी होणार आह़े
विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी 2 महिन्यांपासून संपावर आहेत़ यामुळे होत असलेले प्रवाशांचे नुकसान व कामगार नियमांचा भंग यासाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आपल्या 56 कर्मचारी व 6 कर्मचारी संघटना यांच्याविरूद्ध कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होत़ी एसटीच्यावतीने रत्नागिरीतील ऍड. एस़ एम. देसाई खटल्याचे कामकाज पाहत आहेत़
जिह्यामध्ये मंगळवारीही एसटीच्या 350 हून अधिक फेऱया सोडण्यात विभागाला यश आल़े 562 कर्मचारी हजर झाले असून 267 अधिकृत रजेवर आहेत. हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 136 प्रशासकीय, 205 कार्यशाळा, 86 चालक, 70 वाहक, 65 चालक तथा वाहकांचा समावेश आह़े हजर होणाऱया कर्मचाऱयांच्या संख्येत वाढ होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले. मंगळवारी 27 हजाराहून अधिक प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आह़े
…