प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एसटीबसची चाके पुन्हा वेगाने धावत होती. प्रवाशांची संख्याही वाढली होती. यामुळे उत्पन्न वाढीस लागले होते. तोच पुन्हा कोरोनाने थैमान घातल्याने मिनी लॉकडाऊनचा फटका परिवहन महामंडळाला बसला आहे.
पुणे, मुंबईसह साताऱयात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. यामुळे चाकरमानी परतीच्या वाटेवर आहेत. सातारा जिह्यातून पुणे, मुंबई, बोरोवली येथे जाणाऱया प्रवाशांची संख्या जास्त आहे. तसेच येथून जिह्यात येणाऱया प्रवाशांची संख्या कमी आहे. सायंकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असल्याने या संचारबंदीतील एसटी बसच्या सर्व फेऱया रद्द केल्या आहेत. यामुळे पुन्हा उत्पन्नला फटका बसला आहे. अशी माहिती सातारा आगार प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली.