ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भातील त्रिसदस्यीय समितीचा अहवाल रात्री उशिरा मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. एसटी कर्मचारी संपाच्या तिढ्य़ावर पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला होणार आहे. राज्य सरकारच्या वकील पिंकी भन्साली यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पगारवाढ आणि एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, यासाठी मागील साडेतीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जवळपास 41 टक्क्मयांची पगारवाढ देऊन नोकरीत पुन्हा रूजू होण्यासाठी आवाहन केलं. त्यानंतरही काही संघटना संपावर ठाम आहेत. त्यामुळे यासंदर्भात मोठा निर्णय अपेक्षित होता. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याविषयी विचार करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समितीने शिफारस अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला आहे. 22 फेबुवारीला यावर पुढील सुनावणी होणार आहे.