सातारा / प्रतिनिधी
सातारा विभागात राज्य परिवहन महामंडळाच्या 2019 मध्ये भरती झालेल्या कर्मचायांवर अन्याय झाला होता. लॉक डॉउन काळात त्याना सेवेतून तात्पुरते स्थगिती देण्यात आली होती.या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा केला होता.परब यांनी राज्यातील कर्मचायांना परत सेवेत घेतले आहे.सातारा जिह्यात सुमारे 100 जणांना पुन्हा कामावर घेतल्याने सेना कर्मचारी संघटनेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.