कंपनी व्यवस्थापनाला आज देणार संपाची नोटीस : पुन्हा वाद पेटण्याची शक्यता
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या दोन वर्षापासून धुमसत असलेला भुईपाल एसीजीएल-बसबांधणी कंपनीचे व्यवस्थापन कामगारांमधील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. तब्बल एक महिना आंदोलन सुरू करूनसुद्धा पदरी निराशाच आल्यानंतर आता पुन्हा एकदा कामगारांनी बुधावारी बेमुदत संपाची नोटीस देण्याचा कंपनाच्या प्रवेशद्वाराबाहेर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे व्यवस्थापन व कामगार यांच्यामधील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्मयता निर्माण झालेली आहे. एसीजीएल कंपनी कामगार व व्यवस्थापन यांच्यात गेल्या जवळपास दोन वर्षापासून वाद शिगेला पोचलेला आहे. कामगारांच्या मागण्यांकडे व्यवस्थापन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वारंवार करण्यात येत होता. या संदर्भात अनेकवेळा गोवा राज्याचे मुख्यमंत्री स्थानिक आमदार प्रतापसिंह राणे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे संपर्क साधून सुद्धा कामगारांच्या पदरात निराशा पडली. यामुळे कामगारांनी दोन महिन्यापूर्वी अशा प्रकारची संपाची नोटीस देऊन जवळपास वीस दिवस संप केला होता. मात्र त्यावेळी कंपनी व्यवस्थापन तसेच सरकारी यंत्रणेने दखल घेतली नाही. त्यावेळी संप संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने या संदर्भात बोलणे होऊन कामगारांच्या असलेल्या मागण्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, अशी कामगारांची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आज एक महत्त्वाची बैठक कंपनीच्या परिसरामध्ये संध्याकाळी काम संपल्यानंतर घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व कामगार यांच्या परवानगीने पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यावेळी मोठय़ा प्रमाणात कामगारांची उपस्थिती होती. गेल्या तीन वर्षांपासून व्यवस्थापन विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप या सभेमध्ये करण्यात आला व कामगारांच्या अस्तित्वासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी सादर करण्यात आलेल्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील व त्याचा पहिला टप्पा म्हणून पुन्हा एकदा संपाची नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यासंदर्भात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कंपनीच्या सर्व कामगारांच्या परवानगीने ही नोटीस देण्यात येणार आहे. जोपर्यंत मागण्या बेमुदत संपाला सुरुवात करण्यात येणार असून आता कोणत्याही परिस्थितीत मोडेन पण वाकणार नाही, अशी भूमिका कामगार बांधव घेण्यात येणार असल्याचे सदर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या अनेक सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामगारांनी दोन महिन्यांपूर्वी कामगार संघटनेने मनसे कामगार संघटनेशी संलग्न होऊन हा संप केला होता. मात्र आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला. मात्र कंपनीने कामगारांचा कोणत्याही अपेक्षाभंग केला, त्यामुळे असल्यामुळे पुन्हा एकदा कामगार बांधवांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.