अखेर करारावर सहय़ा, कामगाराला मिळणार महिन्याला 5500 रु.ची वाढ
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेला भुईपाल एसीजीएल कामगार संघटनेच्या पगारवाढीच्या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवारी कामगार संघटना व व्यवस्थापनचे पदाधिकारी यांच्या दरम्यान करारावर सहय़ा झाल्यामुळे तीन वर्षापासून प्रलंबित असलेली ही समस्या सध्या तरी सुटलेली आहे.
भुईपाल येथील एसीजीएल कंपनी कामगार संघटनेच्यावतीने कंपनीच्या व्यवस्थापनाला विविध मागण्या सादर केल्या होत्या. गेल्या काही वर्षापासून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगार संघटनेकडून करण्यात येत होता. दोन महिन्यापूर्वी याप्रश्नी दहा दिवसाचे आंदोलन केल्याने व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. कामगार संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेशी संलग्न होऊन कामगारांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याकडे विशेष लक्ष हा प्रश्न सध्या तरी धसास लागलेला आहे.
एकूण नवीन करारानुसार प्रत्येक कामगाराला प्रति महिना 5500 रुपयांची पगारवाढ प्राप्त होणार आहे. दरम्यान 2 मार्च रोजी कामगार पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्मयता होती. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करून व्यवस्थापनचे पदाधिकारी व कामगार संघटना पदाधिकारी यांच्या दरम्यान एक संयुक्त बैठक घेतली. या बाबत मुद्दा संपुष्टात आणण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजाविली. शेवटी कामगार संघटनेने सादर केलेल्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रत्येक कामगाराला 5500 रुपयांची पगारवाढ या मुद्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंगळवारी कंपनीच्या सभागृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण व कंपनीच्यावतीने वरि÷ अधिकाऱयांची उपस्थिती होती. या कामगार संघटना पदाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्या दरम्यान झालेली चर्चा व करारावर सहय़ा केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे कामगारांना आता प्रत्येक महिन्याला 5500 रुपयांची वाढ प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या थकबाकी बाबततही करारावर सहय़ा झालेल्या आहेत.
यावेळी व्यवस्थापनचे वरि÷ अधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेचे वरि÷ पदाधिकारी व एसीजीएल कामगार संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी यांची खास उपस्थिती होती. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार संघटना अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, पदाधिकारी संतोष धुरी, यशवंत हाडगे, दिनेश चव्हाण, एच.आर मॅनेजर प्रकाश नाईक, प्रकल्प अधिकारी दिलीप देसाई, कामगार युनियन अध्यक्ष बाबलो सावंत, उपाध्यक्ष प्रशांत खानोलकर, सचिव सुभाष परब, खजिनदार शेखर नाईक, सभासद विनोद देसाई, मुरारी घाडी, सूर्याकांत गावस, एम्लोईज युनियन अध्यक्ष गुणाजी परब, खजिनदार हरिश्चंद्र नाईक, सचिव महेश दिवकर, उपाध्यक्ष कालिदास नाईक, सभासद-जयसिंग देसाई, अर्जुन सावंत, बाळा साळगांवकर, बाबुराव देरगुणकर, राजेंद्र गाड यांचा प्रामुख्याने समावेश होता.