आम आदमी पार्टीचे एसीबी अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
भ्रष्टाचार प्रकरण होऊन 9 वर्षे उलटली तरी अद्याप दोषारोप दाखल करण्यात आले नाहीत. सर्वसामान्य व्यक्तीच्या विरोधात मात्र तातडीने दोषारोप दाखल केले जातात. मात्र राजकीय व्यक्तीच्या विरोधात हे दोषारोप दाखल होत नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधींवर तातडीने दोषारोप दाखल करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने एसीबी अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण आहे. कोणतेही प्रकरण झाल्यानंतर सहा महिन्यात दोषारोप दाखल केले जातात.
मात्र एसीबी बेळगावमधील त्या राजकीय व्यक्तीच्या विरोधात दोषारोप दाखल करत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एक आठवडय़ामध्ये दोषारोप दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील आम आदमी पार्टीच्यावतीने देण्यात आला आहे.
एसीबीचे डीएसपी जे. एम. करुणाकर शेट्टी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, उत्तर कर्नाटकचे झोनल प्रमुख राजकुमार टोपण्णावर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.