तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मजुरांना परराज्याच्या सीमेवर सोडणे तसेस जिल्हाअंतर्गत वाहतूक करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य परिवहन बससेवा सुरु करण्यात आलेली आहे. एस.टी. कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी शासनाच्या मदत कार्यात रात्रदिवस काम करत आहेत. त्यामुळे मदत कार्य करताना कोरोनाशी संबंध येऊन एस.टी.कर्मचार्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
तसेच कर्मचार्यांना विमा संरक्षण नसल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु महाराष्ट्र शासनाने संदर्भात निर्णयान्वये कोरोनाच्या सार्वजिक साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावित असताना शासनाच्या विविध विभागातील, विविध प्रवर्गातील कर्मचारी यांना कोरोना विषापूशी जवळून संबंध येत आहे. अशा कर्मचा – यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी 50 लाख रुपये रकमेचे सानुग्रह सहाय्य काही अटींच्या अधीन राहुन प्रदान करण्याचा शासनाने आदेश पारीत केला आहे.
सदर संदर्भित आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास लागू आहे. तरी कृपया संदर्भित शासन निर्णयानुसार एस.टी. कर्मचा – यांचा मदत कार्यात कोव्हीड-19 या विषाणूमुळे दुर्दैवी मृत्यु झाल्यास रुपये 50 लाखाचे विमा कवच / सानुग्रह सहय्य देण्यात यावे तसेच यासंदर्भातराज्य परिवहन महामंडळ स्तरावर परिपत्रकिय सुचना प्रसारीत करण्यात याव्यात असे या निवेदनात म्हटले आहे.