सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने कामागांराचे तीन माहिन्याचे थकीत वेतन तातडीने मिळावे. म्हणून आत्मक्लेश उपोषण विभागीय कार्यालयासमोर राज्यभर करणेत आले. एस टी महामंडळाने एक महिन्याचे वेतन अदा करून कामगांराच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या वेतनाची प्रत्यक्ष हाती येणारी रक्कम कमी असल्याने कामगांराच्या दैनदिन आर्थिक गरजा उधारी-उसणवारी भागवणे त्यांना अशक्य आहे. म्हणूा कामगाराच्यावतीने आत्मक्लेश उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला आहे. एस, टी. महामंडळाचा अत्यावश्यक सेवा म्हणून सुमारे ३० वर्षापासून वापर होत आहे. एस. टी. महामंडळाचा कारभार हा नफा मिळविण्यासाठी नसून जनतेस किफायतशीर सेवा देण्यासाठी “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर स्थापन झाले आहे.
परंतु खाजगी वाहतुकदार सर्रासपणे टप्पे वाहतूकीचा वापर करीत असल्यामुळे महामंडळाचा संचित तोटा रू ६००० कोटी रुपयांवर गेलेला असून दिवसेंदिवस तोटा वाढतच चाललेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे व एस. टी. कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करून, शासकीय कर्मचार्या प्रमाणे वेतन व भत्ते देण्यात यावेत. असे केल्यास नक्कीच एस. टी. ला व कर्मचार्यांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. तरी दोन माहिन्याचे थकीत वेतन तातडीने आदा करावे, आशा मागण्या करण्यात आल्या. सदर आत्मक्लेश उपोषण विभागीय अध्यक्ष अशोक खोत व विभागीय कार्याध्यक्ष शम्मु मुल्ला नेतृत्वाखाली करण्यात आले.