कर्मचाऱयांनी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष : नियमांचे पालन करून शासकीय वेळेनुसार बस सोडण्याचे आदेश
प्रतिनिधी / ओरोस:
शासकीय कर्मचाऱयांच्या सोयीसाठी कणकवली आगारातून सोडण्यात येणाऱया एस.टी. बसच्या वेळेमध्ये बदल केल्याने कर्मचाऱयांची मोठी गैरसोय होत आहे तसेच या बसमधून जादा प्रवाशांची वाहतूक करून एस.टी प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप कणकवली ते मुख्यालय प्रवास करणाऱया कर्मचाऱयांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्यात आले असून त्यांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कर्मचाऱयांच्या वेळा विचारात घेऊन गाडय़ा सोडाव्यात, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी एस.टमाr. प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱयांना ने-आण करण्यासाठी कणकवली बस स्थानकातून एसटी बस सोडण्यात आली. तर या बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवासी वाहतूक करण्याबाबत आदेश देण्यात आले. मात्र, एसटी महामंडळाकडून नियमांचे उल्लंघन करूत ठरवून देण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याबाबत शासकीय कर्मचाऱयानी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयाचे लक्ष वेधले होते. तसेच कणकवली वरून सिंधुदुर्गनगरी येथे येणाऱया कर्मचाऱयांची संख्या अधिक असल्याने दोन एसटी बस सोडण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रुग्णालयीन कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा!
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असून सिंधुदुर्ग जिल्हय़ात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सेवेत असलेले काही कर्मचारी कणकवलीतून त्याच एस.टी. बसमधून प्रवास करीत आहेत. या कर्मचाऱयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोरोना रुग्णांशी संपर्क येत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य कर्मचाऱयांना बाधा होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. तरी रुग्णालयातील कर्मचाऱयांसाठी एस.टी.ची स्वतंत्र व्यवस्था करावी. मुख्यालय कर्मचाऱयांसाठी सोडण्यात येणाऱया बसच्या वेळेबाबत लक्ष वेधले आहे. सदर बस सकाळी नऊ वाजता व सायंकाळी पावणेसहा वाजता सोडण्यात येत आहे. ही वेळ चुकीची असल्याने कार्यालय त्यामुळे ही बस सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अप्पर जिल्हाधिकाऱयांच्या एस.टी. प्रशासनाला सूचना
दरम्यान जिल्हाधाकरी कार्यालयाने कर्मचाऱयांच्या मागणीची गंभीर दखल घेत. कार्यालयीन वेळेनुसार सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सोडावी व ही बस विनाथांबा असावी. त्यामध्ये सामाजिक अंतर राखण्यात यावे, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी एसटी विभाग नियंत्रक कणकवली यांना दिले आहेत