प्रतिनिधी/ चिपळूण
एस. टी. कर्मचाऱयांचा संप सुरू असल्याने गेल्या 5 दिवसांपासून सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. साहजिकच प्रवाशांचा ओढा रेल्वेकडे वळू लागला आहे. मात्र रेल्वे प्रशासन अद्यापही कोरोनाच्या नावाखाली ऑनलाईन बुकिंगवर ठाम आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी करंट बुकिंग सुरू करण्याची मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने केली आहे.
सध्या एस टी. कर्मचाऱयांचा बेमुदत संप सुरू असल्याने प्रवाशांचा ओढा रेल्वेकडे आहे, परंतु करंट बुकिंग उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे पुन्हा रांगेत उभे राहून दुसरे आरक्षण घ्यावे लागत आहे. एकाच खिडकीवर आरक्षणाची सुविधा असल्यानेही मोठी अडचण होत आहे.
प्रवाशांची ही गैरसोय पाहून अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी येथील अधिकाऱयांची भेट घेत चिपळूण रेल्वेस्थानकावरील बंद तिकीट घर सुरू करून गैरसोय दूर करण्याची मागणी केली. तत्काळ हा विषय वरिष्ठ अधिकाऱयांकडे पाठवा, अन्यथा रेल्वेस्थानकात ठिय्या आंदोलन सुरू करावे लागेल, असा इसारादेखील त्यांनी दिला आहे.