परिक्षिती प्रमाणेच महामुनी शुकदेवांना देवतांनी कृष्णाबरोबर जे वर्तन केले ते आवडले नाही.
राया पहा पां कौरवनाथा । केवढी देवांची कृतघ्नता।
धिग् धिग् त्यांची वरि÷ता। द्रविणाढ्यता धिक् त्यांची। अहो इंद्रें द्वारकेप्रति । जाऊनि परमदीनवृत्ति। करुणा भाकूनियां श्रीपति । कथिली आर्ति बहुसाल। श्रीकृष्णाच्या चरणा निकटीं। नमस्कारितां मुकुटकोटि । वारंवार पादपीठीं । संघटती तें विसरला। दीनवदनें अनाथपणें । सांगे रडोनियां गाऱहाणें । तोंड करूनि केविलवाणें ।विनीतपणें विनवूनियां। स्वकार्य साधावयालागीं । याचिला कैपक्षी शार्ङ्गी। तें कार्य साधिल्या लागवेगीं। युद्धप्रसंगीं मिसळला। अच्यतैश्वर्यसंपन्न। विशेष आपुला अर्थसाधन। ऐशातें जाणोनि संक्रंदन। सिद्धार्थ होऊन पालटला । आपुला साधल्यानंतर अर्थ। पार्यातकाचा धरूनि स्वार्थ। इंद्राणीचे भिडेनिमित्त। त्रैलोक्मयनाथ विरोधिला। विचार तरी केला काय। भौमापुढें इंद्र गाय । तो भौम जेणें मशकप्राय। वधूनि सुरसाह्य साधिलें। तो कृष्ण आकळेल संग्रामीं। हें न जाणवे हृदयपद्मी। महाक्रोधतमाची ऊर्मी। बळें संग्रामीं संघटले। ऐसें सुरांचें मूर्खपण। धिग् धिग् महत्त्व थोरपण। धिग् धिग् ऐश्वर्यताअभिमान। धिक्कार पूर्ण धनाढ्यत्वा ।
महामुनी शुकदेव म्हणतात – जेव्हा इंद्राने आपले काम साधावयाचे होते, तेव्हा त्याने आपले मस्तक लववून मुकुटाच्या टोकांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करुन त्यांच्याकडून साहाय्यची भिक्षा मागितली होती, परंतु जेव्हा काम झाले, तेव्हा त्यांनी त्याच श्रीकृष्णांशी लढाई केली. खरोखर या देवांच्या मूर्खपणाचा आणि वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो! यानंतर अविनाशी भगवान श्रीकृष्णांनी एकाच मुहूर्तावर, निरनिराळय़ा भवनांमध्ये, वेगवेगळी रूपे धारण करून, एकाच वेळी, त्या सर्व राजकुमारींचे शास्त्राsक्त विधीने पाणिग्रहण केले. त्या महालांमध्ये अशी दिव्य सामग्री भरलेली होती की, त्याच्या बरोबरीची जगात कोठेही असणार नाही. मग अधिकाची तर गोष्टच सोडा. त्या महालांमध्ये राहून अतक्मर्य लीला करणारे भगवान आत्मानंदात मग्न असूनही लक्ष्मीच्या अंशरूप अशा त्या पत्नींबरोबर, जसा एखादा सामान्य गृहस्थाश्रमी राहतो, त्याप्रमाणे राहून गृहस्थधर्माप्रमाणे आचरण करीत रमत होते. ब्रह्मदेवादिकांनाही ज्यांना प्राप्त करून घेण्याचा उपाय माहीत नाही, त्याच रमारमणांना त्या स्त्रियांनी पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते. आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंदाची वृद्धी होत होती. त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त कटाक्ष, नवसमागम, प्रेमलाप व प्रेमभाव वाढविणाऱया लज्जेने युक्त होऊन भगवंतांची सर्वभावे सेवा करीत होत्या.
पत्न्यांच्याबरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी राहात असत. तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत असत, तेव्हा त्या स्वत: पुढे होऊन आदराने त्यांना घेऊन येत, श्रे÷ आसनावर बसवीत, उत्तम सामग्रीनी त्यांची पूजा करीत, चरणकमले धूत, विडा करून देत, पाय चेपून थकवा दूर करीत, पंख्याने वारा घालीत, चंदन इत्यादी लावीत, फुलांचे हार घालीत, केस विंचरीत, स्नान घालीत आणि अनेक प्रकारचे पदार्थ करून भोजन घालीत. अशा रीतीने स्वत:च्या हातांनी भगवंतांची सेवा करीत.