नवी दिल्ली
ऑक्टोबरपासून वाहनांमध्ये एअरबॅग बसवणे बंधनकारक असल्याची माहिती देण्यात आली आहे. या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून 8 जण बसतील अशा वाहनांनी कमीत कमी 6 एअरबॅगची व्यवस्था आपल्या गाडीमध्ये करणे बंधनकारक असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे.
एअर बॅगच्या अंमलबजावणीला ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भातली घोषणा अलीकडेच केंद्रीय परिवहन मंत्रालयाने केली होती. दुर्घटनेच्यावेळी एअर बॅगचे महत्त्व खूप मोठे असते, म्हणूनच अशी सक्ती करण्यात आली असल्याचेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 1 जुलै 2019 पासून वाहनचालकाला एअर बॅगची सक्ती करण्यात आली आहे. पण जानेवारी 2022 पासून चालकासोबतच्या बाजुच्या प्रवाशालाही एअर बॅगची सक्ती करण्यात आली आहे.