वाढीसह 110.22 लाख टनावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात साखरेचे उत्पादन ऑक्टोबर-डिसेंबरच्या दरम्यान वर्षाच्या आधारे 42 टक्क्यांनी वधारुन 110.22 लाख टनावर राहिले आहे. व्यापारी आकडेवारीतून ही माहिती दिली आहे. अधिकचे झालेले ऊस उत्पादन तसेच महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याचा हंगाम लवकर सुरु झाल्याने उत्पादनाने वेग पकडला आहे. साखर व्यापारी वर्ष ऑक्टोबर-सप्टेंबरदरम्यान असते.
भारतीय साखर कारखाना संघ (इस्मा) यांच्या माहितीनुसार साखर कारखान्याने वर्ष 2020-21 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीत 110.22 लाख टन साखर उत्पादन केले असून मागील वर्षातील याच कालवधीत 77.63 लाख टन साखर उत्पादन झाले होते.
काही कालावधीत महाराष्ट्रामध्ये साखर उत्पादन 39.86 लाख टन राहिले तर एक वर्षातील समान कालावधीत हा आकडा 16.50 लाख टन राहिला होता.
सरकारने साखरेचा अधिकचा असणारा साठा खपावा यासाठी सप्टेंबरमध्ये समाप्त झालेल्या विपणन वर्ष 2020-21 च्या दरम्यान 60 लाख टन साखर निर्यातीचे ध्येय निश्चित केले आहे. इस्माने दिलेल्या माहितीनुसार दुसऱया सर्वात मोठय़ा साखर निर्यात देशात थायलंडचा समावेश राहिलेला आहे. भारताकडून पश्चिम आशिया, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांना साखर निर्यात होते.