अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 29 ऑगस्ट 2021, स. 11.00
● शनिवारी रात्री अहवालात 424 बाधित
● एकूण 13,529 जणांची तपासणी
● दोन वेळा वाढ पाचशेच्या खाली
● मात्र तीन अंकी वाढीचा वेग तसाच
● बाधित वाढ, मृत्यू थांबणार तरी कधी?
सातारा / प्रतिनिधी :
गेल्या तीन-चार महिन्यांपासून असून सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. वाढ तीन अंकावर स्थिर आहे. ती कधी आठशे, हजाराला जाऊन भिडत आहे. गत शनिवारी एक महिन्यापासून पहिल्यांदा ती पाचशेच्या खाली गेली त्यावेळी 480 जणांचा अहवाल अबाधित आला होता. त्यानंतर बाधित वाढ पाचशेच्या वरच राहिलेली असून, तीन अंकी वाढीचा वेग तसाच आहे हे फक्त गत आठवड्यात मृत्यू दराचा भोगवटा संपल्याचा दिलासा सोडल्यास दर शनिवारी अहवालाचा पुन्हा हा दिलासा मिळाला असून, फक्त 424 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. मात्र पुण्या-मुंबईसारख्या कार्पोरेट शहरांमध्ये रुग्ण वाढ दोनशे-तीनशे च्या खाली आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील मात्र वाढ ऑगस्ट अखेरीस देखील थांबत नसल्याने स्थिती चिंताजनकच आहे.
शनिवारी अहवालात 424 बाधित
दरम्यान शनिवारी रात्री प्रशासन दिलेल्या अहवालानुसार एकूण 14,529 जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये 424 जणांचा अहवाल बाधीत आला आहे. तपासण्याची संख्या वाढली आहे मात्र यामध्ये बाधित वाढीचा वेग मंदावला असल्याने पॉझिटिव्हिटी दरही खाली घसरत असल्याचा मोठा दिलासा आहे मात्र तीन अंकी संख्येने सुरू असलेली बाधित वाढ थांबत नसल्याचे वास्तव आहे.
पाच तालुक्यात आलेख खाली वर
गत आठवड्यापासून कराडकरांना दिलासा मिळत आहे. कराड तालुक्यात तीन अंकी संख्येने होणारी बाधित वाढ थांबली आहे. मात्र सातारा, फलटण मध्ये सातत्याने मोठी वाढ सुरु आहे. तर अधून-मधून खटाव, माण कोरेगाव तालुक्यात स्थिती चिंताजनक होत आहे. वाई खंडाळा सावरताना दिसत असून महाबळेश्वर जावळी पाटण तालुके आहेत तिथे एक अंकी संख्येने रुग्ण वाढ समोर येताना दिसत आहे.
मृत्युचा फुगवटा संपल्याचा दिलासा
ऑगस्ट महिन्यात अनेक वेळा मृत्यू संख्येने जिल्हावासीयांना घाबरवुन सोडले. एकाच दिवशी 54, 45, 43 अशी मृत्यूच्या आकडे येत होते मात्र याबाबत ‘तरुण भारत’ ने जिल्ह्यातील कोव्हीड हॉस्पिटल वेळेवर दैनंदिन मृत्यूची आकडेवारी सादर करत नसल्याने ती उशिरा नोंद होत असून कधी कधी एकाच दिवशी देण्यात येत असल्याने मृत्यू दराचा फुगवटा समोर येत आहे. हे पुराव्यानिशी समोर आणल्यानंतर नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली. त्यानंतर मृत्यूचे आकडे फक्त दोन 2, 9 असे एक अंकी संख्येने समोर येत आहेत हे दिलासादायक असले तरी बाधित वाढ आणि मृत्यू थांबणार तरी कधी? असा सवाल नागरिकांच्या मनात आहे.
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 17,60,654
एकूण बाधित 2,38,189
एकूूूण कोरोनामुक्त 2,26,203
मृत्यू -5, 991
उपचारार्थ रुग्ण- 9,339
शनिवारी जिल्ह्यात
बाधित 540
मृत 2
मुक्त 585