नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात तिसऱया लाटेची सुरुवात ऑगस्टमध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये होऊ शकते असा दावा एका अहवालामधून समोर आला आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱया लाटेइतकी घातक नसेल असेही सांगितले जात आहे. या लाटेमध्ये दिवसाला एक लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येतील असाही अंदाज आहे. हैदराबाद आणि कानपूर आयआयटीमध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधन अहवालात तिसऱया लाटेसंबंधी काही महत्त्वाचे दावे करण्यात आले आहेत.
ऑगस्ट महिन्यातच देशात कोरोनाच्या तिसऱया लाटेचा फैलाव काही प्रमाणात सुरु होईल असे आयआयटीच्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. तिसऱया लाटेमध्ये परिस्थिती चिंताजनक झाल्यास दिवसाला रुग्णसंख्येचा आकडा दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्मयता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये तिसऱया लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून येईल अशी शक्मयताही व्यक्त करण्यात आली आहे. केरळ आणि महाराष्ट्रामधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक होऊ शकते, असेही मत विद्यासागर यांनी नोंदवले आहे.