15 लाख जणांनी गमावल्या नोकऱया : कोरोना महामारीचा परिणाम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील मंदावलेल्या आर्थिक स्थितीदरम्यान ऑगस्ट महिन्यात औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही क्षेत्रातील 15 लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालानुसार, नोकरदार लोकांची संख्या जुलैमध्ये 399.38 दशलक्ष इतकी होती. हा आकडा कमी होऊन ऑगस्टमध्ये 397.78 दशलक्ष इतका झाला आहे.
सीएमआयईच्या मते, राष्ट्रीय बेरोजगारीचा दर जुलैमध्ये 6.95 टक्क्मयांवरून 8.32 टक्क्मयांवर गेला आहे. हा दर जुलैमध्ये 8.32 टक्के, जूनमध्ये 10.07 टक्के, मे महिन्यात 14.73 टक्के आणि एप्रिलमध्ये 9.78 टक्के इतका होता. मार्च महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट भारतात येण्यापूर्वी, शहरी बेरोजगारीचा दर सुमारे 7.27 टक्के होता. ग्रामीण बेरोजगारी ऑगस्टमध्ये 1.3 टक्क्मयांनी वाढून 7.64 टक्क्मयांवर पोहोचली आहे. यापूर्वी जुलैमध्ये हे प्रमाण 6.34 टक्के होते. एकंदर या ‘सीएमआयई’च्या अहवालानुसार केवळ एका महिन्यात ग्रामीण भारतात सुमारे 13 लाख लोकांच्या नोकऱया गेल्याचेही दिसून येत आहे.
ऑगस्टमध्ये रोजगाराच्या दरात घट झाली असली तरी त्याच महिन्यात कर्मचाऱयांच्या सहभागाच्या दरात किंचित वाढ झालेली दिसून येत आहे. जुलैमध्ये नोकरीत भर घालणाऱया प्रवर्गात मुख्यत्वेकरून सर्वसाधारण दर्जाच्या अनौपचारिक नोकऱयांचा समावेश असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटापासून देश जोपर्यंत अर्थव्यवस्थेला सावरत नाही, तोपर्यंत या नोकरीच्या शोधात गुंतलेल्या लोकांना पर्याय शोधणे कठीण जाईल. साहजिकच याचा परिणाम बेरोजगारी दरावर दिसून येणार आहे.
देशभरात मोठय़ा संख्येने लोक नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. जुलैमध्ये सुमारे 30 दशलक्ष लोक नोकरीच्या शोधात होते. हेच प्रमाण ऑगस्टमध्ये वाढून 36 दशलक्ष इतके झाले आहे. याचदरम्यान एकूण कामगार शक्तीचा आकारही वाढला आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे अनेक कंपन्या किंवा उद्योग बंद होते. कंपन्या बंद झाल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. भारतात मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे नोकऱया आणि रोजगारांच्या बऱयाच समस्या निर्माण झालेल्या दिसत आहेत.