नवी दिल्ली : 57 अब्ज डॉलर्सच्या उलाढालीच्या भारतीय ऑटो सुटय़ा भागांच्या उद्योगाने चिनी उत्पादनांच्या बहिष्कारासंदर्भात पुढचे पाऊल उचलले आहे. भारत-चीन देशातील सीमातणाव वाढत असून भारतीय ऑटो कंपन्यांनी चीनवरील आयातीचे प्रमाण कमी करण्याचे ठरवले आहे. 2018-19 सालात भारताने 17.6 अब्ज डॉलर्सचे सुटेभाग आयात केले होते. ज्यापैकी 27 टक्के (4.75 अब्ज डॉलर्स), चीनमधून सुटय़ा भागाची आयात केली आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारतातूनच सुटे भाग घेण्याचा अवलंब केला जाणार आहे. यासंदर्भात ऑटो कंपन्या व सरकार यांना एकत्रितरित्या काम करावं लागेल. व्यवसाय सुलभता, कमी दरात भांडवली गुंतवणूक व जागतिक जलवाहतुकीची उत्तम सोय याबाबी सोडवल्या गेल्यास भारतालाही सुटय़ा भागाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ट्रान्समिशन, स्टीअरिंगचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल साहित्य, कुलिंग सिस्टम्स, सस्पेन्शन तसेच ब्रेकिंगचे भाग चीनमधून आयात केले जातात.
Previous Articleअँडी मरेचा पराभव
Next Article एसीबीच्या छाप्याने बेळगावात खळबळ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.