ऑनलाईन शिक्षणाला फटका, अनेक गावात रेंजची समस्या, शिक्षक-विद्यार्थी हैराण
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षण खात्याने गुरुवारपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ केला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र तालुक्मयातील बऱयाचशा गावात मोबाईलला सुरळीत रेंज मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणात अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय रेंजअभावी शिक्षक, विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत.
कोरोनामुळे मागीलवर्षापासून शाळेचे वर्ग बंद झाले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धत अवलंबली जात आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. दरम्यान शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने पाठय़क्रम शिकविण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मोबाईल टॉवर नाहीत. काही गावात मोबाईल टॉवर असूनदेखील सुरळीत रेंज मिळत नाही. त्यामुळे रेंजअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे.
बेळगाव तालुक्मयातील हंदिगनूर, अतिवाड, अलतगा, बडस, कोनेवाडी, बाची, मण्णीकेरी, बोडकेनहट्टी, कुरिहाळ, बंबरगे, म्हाळेनट्टी, केदनूर, कट्टणभावी, चलवेनहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, धामणे एस, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी, निंगेनहट्टी बसरीकट्टी, शिंदोळी, निलजी, मुतगा आदी गावांमध्ये मोबाईलना सुरळीत रेंज मिळत नसल्यामुळे अभ्यासात व्यत्यय निर्माण होत आहे. काहीवेळेला विद्यार्थ्यांना रेंज शोधण्यासाठी घरच्या स्लॅबवर व इतरत्र फिरावे लागत आहे. रेंजअभावी संपर्क होत नाही, चुकून संपर्क झालाच तर आवाज येत नाही, अन् चुकून आवाज आलाच तर मध्येच कॉल खंडित होतो आणि व्हिडिओही बंद होतो. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी महागडे स्मार्टफोन खरेदी केले आहेत. मात्र रेंजअभावी हे स्मार्टफोन कूचकामी ठरताना दिसत आहेत. शिवाय दर महिन्याला रिचार्जसाठी केलेला खर्च रेंज नसल्याने वाया जात आहेत.
काही शिक्षक व विद्यार्थ्यांकडे बीएसएनएल व एअरटेल कंपनीची सीमकार्डे आहेत. मात्र त्या कंपनीचे टॉवरच नाहीत. त्यामुळे मोबाईलवर संपर्क साधायचा असल्यास शाळा सोडून बाहेर जावे लागत आहे. काहीवेळेला वीज गायब झाली की रेंजदेखील गायब होते. त्यामुळे मोबाईलवर सुरू असलेल्या ऑनलाईन अभ्यासात खंड पडत आहे. संबंधित कंपन्यांनी नादुरुस्त टॉवर त्वरित दुरुस्त करून शिक्षक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक व विद्यार्थीवर्गातून होत आहे. ग्रामीण भागात बीएसएनएल, एअरटेल, आयडिया कंपन्यांचे टॉवर आहेत. मात्र या टॉवरवरून सुरळीत रेंज मिळत नसल्याने नेमके कोणत्या कंपनीचे सीमकार्ड वापरावे, असा प्रश्न पडला आहे.