गावे नॉटरिचेबल झाल्याने विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय : चोर्ला, पारवाड, चिखले, मान, हुळंद गावातील विद्यार्थ्यांचे हाल
पिराजी कुऱहाडे / खानापूर
देशभरात कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे वाया गेल्यातच जमा आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाला शैक्षणिक वर्षाची चिंता लागली आहे. यासाठी प्रत्येक राज्य सरकारने वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कर्नाटकात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी विशेष तरतुदी हाती घेतल्या आहेत. शिक्षण खात्याने शाळा भरवण्याचा निर्णय तर कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण देण्यासाठी प्रयत्न हाती घेतले आहेत. प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी प्रत्येक शाळातील विद्यार्थ्यांचे मोबाईल ग्रुप तयार करून त्यांना घरी बसूनच अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे. परंतु सदर अभ्यासक्रम कितपत मुलांपर्यंत पोहोचत आहे. आणि विद्यार्थी ते कितपत हाताळत आहेत हा एक चिंतनाचा भाग बनला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मात्र या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा मोठा घोळ झाला आहे. एरवी वर्गामध्ये फळय़ावर गणिते गिरवतानी अनेक विद्यार्थ्यांना समजत नाही पण आता ऑनलाईनवर दिलेला अभ्यासक्रम कितपत समजतो, हे त्यानाच माहिती.
शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्हीपासून दूर राहावे, अशा अनेकवेळा सूचना, सल्ले देतात. परंतु आता त्याच मुलाना ऑनलाईन शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. बहुतांश मुले आज मोबाईलच्या विळख्यात अडकली आहेत. वेबसाईटवर अनावश्यक साईड ओपन करून त्यामध्ये मग्न होताना दिसतात.
तालुक्मयातील 50 टक्के पालकांच्याकडे स्मार्टफोन असतीलच असे नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा लाभ होणे कठीण जात आहे. अनेक गरीब पालक ज्यांच्याकडे साधा फोन घेण्याची ऐपत नाही ते स्मार्टफोन घेऊन आपल्या मुलांना देतील काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्यावेळी स्मार्टफोन घेतला तरी त्यासाठी महिन्याकाठी लागणारे रिचार्ज हे देखील न परवडणारे आहे.
तालुक्मयातील निम्मा भाग नॉटरिचेबल
तालुक्मयाच्या अनेक भागातील दुर्गम गावे रेंजअभावी आजही वंचित आहेत. तालुक्मयाचा निम्मा भाग जंगलाने व्यापलेला असल्याने मोबाईल तर सोडाच वीजपुरवठाही सुरळीत नसल्याने अंधाराशी सामना करावा लागतो. असे लोक मोबाईल कसा हाताळणार हाही चिंतनाचा प्रश्न आहे. जांबोटी, हेम्माडगा, लोंढा आदी भागातील गावे आजही नॉटरिचेबल असतात. तेथील विद्यार्थ्यांना मोबाईल रेंज हाताळण्यासाठी कधी उंच टेकडीचा तर कधी उंच झाडाचा आधार घ्यावा लागतो.
गोव्याने सुरला येथील टॉवर सुरू करावा
तालुक्मयाच्या सरहद्दीवरील भागात टॉवर नाही पण सध्या गोवा सरकारने सुरल येथे जिओ कंपनीचा टॉवर वर्षापूर्वी उभारला मात्र तो अजूनपर्यंत कार्यान्वित करण्यात आलेला नाही. ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेताना गोव्यातील सुरलसह खानापूर तालुक्मयातील चोर्ला, मान, हुळंद, सडा, पारवाड, चोर्ला अशा सरहद्दीवरील अनेक गावातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड लागत आहे. घनदाट जंगलात विद्यार्थ्यांना नेटवर्कचा शोध घ्यावा लागत आहे. गोवा सरकारने सुरला येथील टावर त्वरित सुरू करावा तसेच कर्नाटक सरकारनेही याबाबत चोर्लासह या भागातील गावात नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चोर्ला भाग अद्यापही नेटवर्कविना
कर्नाटक सीमेवर असलेल्या गावामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा पोहोचत असल्या तरी मोबाईल नेटवर्कची सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही. वर्षापूर्वी सत्तरी पंचायतीच्या पुढाकाराने गोवा सरकारने सुरल या ठिकाणी जिओ कंपनीचा टॉवर उभारला आहे. मात्र अजूनपर्यंत कार्यान्वित झालेला नाही. यामुळे या गावासह चोर्ला भागात अजूनपर्यंत नेटवर्कची सुविधा उपलब्ध झालेली नाही. अन्य कोणतेही नेटवर्क नसल्यामुळे या गावातील विद्यार्थीं ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. गावापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलामध्ये जिओ कंपनीचे नेटवर्क मिळत आहे. यामुळे सदर ठिकाणी बसून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुविधेचा लाभ घ्यावा लागत आहे. मात्र सभोवताली जंगलामध्ये रानटी श्वापदांचा उपद्रव व सापांची भीती, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
नेटवर्कसाठी घनदाट जंगलात शोधावी लागते उंच जागा
तालुक्मयाच्या सरहद्दीवरील अनेक गावात नेटवर्क सुविधा उपलब्ध नाही. नेटवर्कसाठी घनदाट जंगलात उंच जागा शोधून शालेय विद्यार्थी प्रयत्न करतात. जंगली श्वापदांचा भीतीच्या सावटाखालीच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. गेल्या एक वर्षापासून घनदाट जंगलामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी या भागातील विद्यार्थ्यांना उंच भागातील रेंजची जागा सोधावी लागत आहे. चोर्ला, मान, हुळंद या भागात ही गंभीर समस्या आहे. गोवा सरकारने सुरल या ठिकाणी एक टॉवर उभारला आहे. पण तोही कार्यान्वित नसल्याने या भागातील अनेक गावांची कोंडी झाली आहे आधुनिक शिक्षण पद्धतीत या भागातील विद्यार्थी मात्र चांगल्या रेंजअभावी ऑनलाईन शिक्षणापासून मागे रहात आहेत.
-दत्ता गावडे, पारवाड
प्रथम दुर्गंम भागात टॉवर बसवा
शिक्षणाच्या बाबतीत सरकार फक्त शहरी भागातील विद्यार्थांचा विचार करत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि राहिली गोष्ट ऑनलाईन शिक्षणाची. जर सरकारला ऑनलाईन शिक्षण द्यायचेच असेल तर पहिल्यांदा दुर्गंम भागात टॉवर बसवून गावोगावी इंटरनेट पोहचविणे खूप गरजेचे आहे. नाही तर गावातील मुले अशीच रेंजसाठी भटकत राहतील आणि दुर्दैवाने जंगली जनावर किंवा आणखीन कोणत्याही कारणाने अपघात घडू शकेल.
– गुंडू गावडे, चिखले-शिक्षण प्रेमी