मुलींना प्रगतीची संधी देण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन -स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधन
नवी दिली / वृत्तसंस्था
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी राष्ट्राला संबोधित केले. सर्वप्रथम त्यांनी देशात आणि परदेशात राहणाऱया सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि हर्षोल्हासाचा आहे. या वषीच्या स्वातंत्र्यदिनाला विशेष महत्त्व आहे, कारण या वषीपासून आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. या दरम्यान, राष्ट्रपतींनी टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे यश, कोरोना महामारीचे संकट, शेतकरी आणि लसीकरण मोहिमेबद्दल भाष्य केले.
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सहभाग घेतल्याच्या 121 वर्षांमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा इतिहास रचला आहे. भारतीय क्रीडापटूंनी मैदानामध्ये जागतिक दर्जाचे यश प्राप्त करण्यासाठी अनेक अडथळे पार केले आहेत. शिक्षणापासून ते लष्करापर्यंत, प्रयोगशाळांपासून ते खेळाच्या मैदानापर्यंत भारतीय मुली आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मुलींच्या या यशात मला भविष्यातील विकसित भारताची झलक दिसते. अशा आशादायक मुलींच्या कुटुंबांकडून धडा आणि बोध घ्या आणि आपल्या मुलींना प्रोत्साहन द्या, असा सल्ला राष्ट्रपतींनी देशवासियांना दिला. राष्ट्रपतींनी यावेळी आपल्या भाषणात आरोग्य कर्मचारी आणि शेतकऱयांच्या मेहनतीचेही कौतुक केले.
कोरोनास्थितीवर भाष्य
कोरोना साथीची तीव्रता कमी झाली आहे, परंतु त्याचा प्रभाव अद्याप संपलेला नाही. यावषी साथीच्या दुसऱया लाटेच्या विनाशकारी परिणामांपासून आपण अद्याप सावरलेलो नाही. गेल्यावषी सर्व लोकांच्या प्रयत्नांमुळे आम्ही संसर्गाचा प्रसार नियंत्रित करण्यात यशस्वी झालो. वर्षाच्या सुरुवातीला इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली. तरीही आपल्याला कोरोना-व्हायरसच्या दुसऱया लाटेच्या भयानक उदेकाचा सामना करावा लागला. तो संकटाचा काळ होता. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
कोविडच्या साथीमुळे मेटाकुटीला आलेल्या उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार पॅकेजद्वारे मदत करत आहे. गरीबांना मदतीचा हात देत आहे. त्याचवेळी या साथीच्या काळात 23 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर खर्च करण्यात आल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
आत्मनिर्भर योजनेअंतर्गत 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजना आणि अन्नदाता योजनेतून ग्रामीण विकासाला चालना दिली आहे, असेही ते आपल्या संबोधनात म्हणाले. गगनयान मोहीम हे सरकार राबवत आहे. त्यानुसार अंतराळवीरांना परदेशात प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत हे यश संपादन करणारे जगातील चौथे राष्ट्र ठरेल, असा आशावादही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी या देशांत लोकशाही रुजेल का? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र भारताच्या प्राचीन संस्कृतीतच लोकशाहीची मूल्ये रुजली आहेत. गेल्या 75 वर्षात ही रुजलेली लोकशाही जग पाहत आहे. या लोकशाहीचे मानक असणारे संसदेचे नवे सभागृह स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सामोर जाताना पूर्ण होईल, असे राष्ट्रपती म्हणाले.