वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने (एएफआय) 26 सदस्यीय ऍथलेटिक्स संघाची घोषणा केली असून त्यात दुती चंदचाही समावेश करण्यात आला आहे.
जागतिक मानांकनाच्या आधारावर दुती चंद (100 व 200 मी.), एमपी जबिर (पुरुष 400 मी. हर्डल्स), गुरप्रीत सिंग (पुरुष 50 किमी चालणे), अन्नू रानी (महिला भालाफेक) यांचे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले आहे. गुरप्रीत हा अशा प्रकारे पात्रता मिळविलेला त्यातील शेवटचा खेळाडू आहे. या 6 सदस्यीय पथकात 16 ऍथलेट्स, पुरुषांच्या 4ƒ400 मी. रिलेसाठी पाच पुरुष ऍथलेट्स आणि 4ƒ400 मी. मिश्र रिलेसाठी 2 पुरुष व 3 महिला ऍथलेट्सचा त्यात समावेश आहे. तीनही महिला फक्त मिश्र रिलेमध्ये सहभागी होणार असून रविवारी घेण्यात आलेल्या चाचणीनंतर त्यांची निवड करण्यात आली आहे. ऑलिम्पिकमधील ऍथलेटिक्स क्रीडाप्रकार 31 जुलैपासून सुरू होणार असून 9 ऑगस्टला त्याची सांगता होईल.
ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेले ऍथलेटिक्स पथक ः पुरुष-अविनाश साबळे (3000 मी. स्टीपलचेस), एमपी जबिर (400 मी. हर्डल्स), एम.श्रीशंकर (लांब उडी), तजिंदरपाल सिंग तूर (गोळाफेक), नीरज चोप्रा, शिवपाल सिंग (भालाफेक), केटी इरफान, संदीप कुमार, राहुल रोहिला (20 किमी चालणे), गुरप्रीत सिंग (50 किमी चालणे), 4ƒ400 मी. रिले (अमोज जेकब, अरोकिया राजीव, मुहम्मद अनास, नागनाथन पंडी, नोह निर्मल टॉम), 4ƒ400 मी. मिश्र रिले (सार्थक भांब्री, ऍलेक्स अँटोनी).
महिला -दुती चंद (100 व 200 मी. धावणे), कमलप्रीत कौर, सीमा अँटिल पुनिया (थाळीफेक), अन्नू रानी (भालाफेक), भावना जट, प्रियांका गोस्वामी (20 किमी चालणे), 4ƒ400 मी. मिश्र रिले (रेवती वीरमणी, सुभा वेंकटेशन, धनलक्ष्मी शेखर).