ऑनलाईन टीम / केनबर्रा :
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणारी सर्व विमानसेवा 15 मेपर्यंत स्थगित केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आज यासंदर्भात घोषणा केली.
कोरोना रुग्णवाढीमुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक होत असल्याने कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, न्यूझीलंड आणि मालदीवने यापूर्वीच भारतीय विमानांवर बंदी घातली आहे.