मनपा अधिकाऱयांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने संताप
प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव, ओमकारनगर परिसरात गटारीचे बांधकाम करताना डेनेज वाहिनीचे नुकसान झाले आहे. परिणामी सदर डेनेज वाहिनीचे सांडपाणी गटारीमधून वाहत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबत मनपा अधिकाऱयांकडे तक्रार केली होती. पण याची दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्यावर असलेल्या ओमकारनगर येथील विकासकामे राबविताना डेनेज वाहिनीचे नुकसान झाले आहे. सदर वाहिनीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी तक्रार महापालिकेच्या अधिकाऱयांकडे करण्यात आली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. गेल्या महिन्याभरापासून याबाबत सातत्याने तक्रार करूनही दुरुस्तीकडे मनपाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांनी चालविला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना घरात राहणे मुश्कील बनले आहे. सांडपाणी उघडय़ावर गटारीद्वारे वाहत असल्याने दुर्गंधी पसरून आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून डेनेज वाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.