रूंदीही वाढविणार : सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण :नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने दखल
प्रतिनिधी /बेळगाव
आनंद नगर वडगाव परिसरातील नाल्याचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. परिणामी पावसाळय़ात सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने ओमकार नगर नाल्याच्या बांधकामासह रूंदी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरातील बहुतांश नाल्यांवर अतिक्रमण झाले असल्याने पावसाळय़ात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी पूरपरिस्थिती निर्माण होऊन समस्यांचा सामना रहिवाशांना करावा लागतो. पण वडगाव परिसरातील नाल्यांच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने उन्हाळय़ात देखील नाल्यामधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही.
ठिकठिकाणी गटारीमध्ये आणि नाल्यामध्ये सांडपाणी साचुन राहते. परिसरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.
अखेर याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून ओंकार नगर परिसरातून वाहणाऱया नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. अनगोळ -वडगाव संपर्क रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पूल अरूंद आणि कोसळले होते. त्यामुळे या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, रस्त्याच्या रूंदीप्रमाणे नाल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर काम सुरू करण्यात आले असून, अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्यावरील वाहतूक ओंकार नगर मार्गे वळविण्यात आली आहे.