प्रज्ञा मणेरीकर, पणजी
सर्व निर्मात्यांनी मोठा फायदा कमावत आपले चित्रपट ओटीटींना विकले आहेत, ओटीटींच्या आगमनामुळे सिंगल स्क्रीन आपले महत्त्व गमावून बसले आहेत, असे मत व्हायकॉम 18 स्टुडियोचे मुख्य परिचालन अधिकारी अजित अंधारे यांनी व्यक्त केले आहे. झी स्टुडियोजचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल यांनी त्यांच्या मताला दुजोरा दिला. हा मंच दाखल झाल्यापासून ओटीटीवर मनोरंजनविषयक सामग्रीची विक्री खूप मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे आणि ती देखील खूप मोठय़ा फायद्याच्या परताव्याच्या बदल्यात होत आहे, विशेषतः कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण खूपच जास्त असल्याचे पटेल यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर सीआयआयचे सहअध्यक्ष आणि यूएफओ मुव्हीजचे संयुक्त अध्यक्ष कपिल अग्रवाल यांनी सिंगल स्क्रीन वाचवणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे सांगितले. चित्रपट वितरक आणि प्रदर्शक अक्षय राठी यांनी देखील याबाबत सहमती व्यक्त केली. सिंगल स्क्रीनला वाचवणे गरजेचे आहे यात काही शंकाच नाही, असे ते म्हणाले. सध्या कोणत्याही चित्रपट प्रदर्शकाला उत्पन्न मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ’भारतात चित्रपटांचे भवितव्यः संधी आणि आव्हाने’ या विषयावर 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आज एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये रॉय कपूर फिल्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीआयआय माध्यम आणि मनोरंजनविषयक राष्ट्रीय समितीचे सहअध्यक्ष असलेले चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या परिसंवादाचे संचालन केले.
निर्मात्यांसाठी ओटीटी सोयीचे
अलीकडच्या काळात ओटीटीवरील मनोरंजन सामग्रीत आणि दर्शकांमध्ये अतिशय मोठय़ा प्रमाणात झालेल्या वाढीचे अंधारे यांनी विश्ल?षण केले. ओटीटी मंचावर कथेची मांडणी करताना आपल्याला एका मोठय़ा प्रबोधनाचा अनुभव येत आहे, असे ते म्हणाले. घरच्या घरी पाहता येण्याजोगी अधिकाधिक सामग्री ओटीटीवर उपलब्ध होऊ लागल्यामुळे सिंगल स्क्रीन्समधून मिळणाऱा महसूल कमी झाला आहे. ओटीटीच्या सदस्यांची संख्या सतत वाढू लागली आहे, असे त्यांनी सांगितले. निर्माते ओटीटींकडे इतके आकर्षित का होऊ लागले आहेत? निर्मात्यांना आणि वितरकांना ओटीटीवर कोणताही तोटा सहन करावा लागत नाही. ज्यांनी आपली मनोंरजन विषयक सामग्री ओटीटीवर विकली आहे त्यांना 10ज्ञ् पासून अगदी 100ज्ञ् पर्यंत नफा मिळाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ओटीटीवर प्रत्येक चित्रपट यशस्वी ठरत आहे जी बाब निर्मात्यांना भुरळ घालत आहे. कोणतीही स्पर्धा नाही किंवा चित्रपट पडल्याचा शिक्का बसत नाही, असे शारिक पटेल यांनी सांगितले.
’ओटीटी मोठय़ा पडद्याच्या वलयाशी बरोबरी करू शकत नाहीत’ चित्रपट निर्माते अक्षय राठी यांनी मात्र यावेळी या नव्या डिजिटल मंचामधील त्रुटी अधोरेखित केली. ओटीटी म्हणजे एक सोय आहे पण मनोरंजनाचा खरा अनुभव देऊ शकत नाही. मोठय़ा पडद्यावर जो आनंद मिळतो त्या अनुभूतीची बरोबरी ओटीटी करू शकत नाहीत, ही बाब त्यांनी निदर्शनाला आणली.