समता परिषदेचे आक्रोश आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने ओबींसीचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. तसेच राज्य शासनाने मागासवर्गीयाचे पदोन्नतीरल आरक्षण रद्द केले आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे, अशी मागणी मंगळवारी अ. भ. महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. त्यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दादासो चोपडे, महिला अध्यक्षा शितल तिवडे, शहर अध्यक्षा स्वाती काळे, सचिन माळी, लहुजी शिंदे, मनिषा पोवार आदी उपस्थित होते.
महात्मा फुले ब्रिगेडची मागणी
महात्मा फुले बिग्रेडच्यावतीने ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम ठेवा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन माळी, इंद्रायणी चौगुले, प्रकाश माळी, प्रवीण माळी, आप्पासो माळी श्रीशैल माळी, सचिन सुतार, शुभांगी माळी, स्वाती काळे, सतीश माळी, राजेंद्र माळी, दादासो चोपडे आदी उपस्थित होते.