विवाह, सामाजिक, राजकीय व धार्मिक समारंभासाठी 50 लोकांनाच परवानगी
प्रतिनिधी/ सातारा
राज्य शासनाच्या दि. 30 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सातारा जिह्याकरिता जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह. यांनी साथरोग अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 1 जानेवारी 2022 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत.
विवाह व विवाहाच्या अनुषांगिक सोहळ, कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक इत्यादी सर्व प्रकारचे कार्यक्रम, बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळया जागेत असो, याबाबतीत उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. अंत्यसंस्काराच्या बाबतीत, जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल. जिह्यातील पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने अथवा जास्त गर्दी होणारी ठिकाणे तसेच लोकांच्या मोठय़ा गर्दीला आकर्षित करणारी इतर ठिकाणे याबाबत संबंधित घ्ऱण्घ्अऱऊ ण्ध्श्श्Aऱअ तथा उपविभागीय अधिकारी हे, या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या दि.24 डिसेंबर 2021 अन्वये आवश्यकतेनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करु शकतात. या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित केलेल्या व अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.