तालुका म. ए. समिती-युवा म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : तातडीने सर्व्हे करून एकरी 50 हजार देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्मयातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शिवारात तर पाणी केलेच शिवाय शेतकऱयांच्या व साऱयांच्या डोळय़ांतही पाणी आणले आहे. इतका भीषण ओला दुष्काळ असताना अद्याप सरकारने गांभीर्याने घेतले नाही. तेव्हा तातडीने सर्व्हे करून एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱयांची हातातोंडाला आलेली भातपिके वाया गेली आहेत. केवळ भातपिकेच नाही तर भाजीपाला तसेच इतर सर्व पिके खराब झाली आहेत. एक तर कोरोना त्यातच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जे नुकसान झाले आहे ते भरून निघण्यासारखे नाही. असे असताना शेतकऱयाची सरकारने थट्टा करण्यासाठी प्रतिगुंठा 68 रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा, योग्यप्रकारे सर्व्हे करावा आणि जितके नुकसान झाले आहे, तेवढी भरपाई प्रत्येक शेतकऱयाला द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
आता रब्बी हंगाम पेरणी करण्यासाठी शेतकऱयाला तयारी करावी लागणार आहे. त्यापूर्वी तातडीने सर्व्हे होणे गरजेचे आहे. सर्व्हे सर्वत्र करावा. काही ठिकाणी भेटी द्यायच्या आणि काही ठिकाणी जायचेच नाही, असा प्रकार घडू नये. तेव्हा तातडीने सर्व्हे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. जिल्हाधिकारी व्यंकटेशकुमार यांना निवेदन देण्यात आले.
युवा समितीतर्फेही निवेदन
ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱयांच्या बांदावर जाऊनच पंचनामा करावा, अशी मागणी युवा म. ए. समितीच्यावतीने करण्यात आली. सध्या जी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे ती तुटपुंजी आहे. तेव्हा योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, पिराजी मुचंडी, तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अष्टेकर, लक्ष्मण होनगेकर, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, एस. एल. चौगुले, राजाभाऊ पाटील, आप्पाजी जाधव, तालुका पंचायत माजी सदस्य रावजी पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, राजू पावले, ग्राम पंचायत सदस्य राकेश परीट, परशराम परीट, दयानंद उघाडे, प्रमोद पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.