नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
कोरोनाचा देशात कहर सुरुच असुन कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचं मोठं आवाहन प्रशासनासमोर आहे. यासाठी कोरोना रुग्णांना आवश्यक उपचार त्वरीत मिळावेत या साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राष्ट्रीय धोरणात बदल करण्यास सुरु केले असुन याचाच भाग म्हणुन आज एक नविन नियमाचा समावेश करत कोरोना बाधितांना दिलासा देतानाच रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्याचा प्रयत्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. रुग्णास केवळ शहरातील नाही या कारणावरुन प्रवेश नाकारता येणार नाही.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय धोरण तयार केलं होतं. यात आरटीपीसीआर चाचणीसह काही नियम घालून देण्यात आले होते. या नियमावलीमुळे रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यास रुग्णालये नकार देत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याच रुग्णाच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करणाऱ्या नियमावलीला बदलत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय धोरणात हे बदल केले आहेत.
यामध्ये रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. तसेच रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी करोना संशयित रुग्णाला कोविड सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावं.रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.