वाहनचालकांमधून नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
गोगटे सर्कंल येथील ओव्हरब्रिजवरील कचऱयाची उचल करण्यात येत नसल्याने सर्वत्र कचरा साचला आहे. झाडांचा पालापाचोळा सोबतच प्लास्टिकच्या पिशव्या तसेच इतर कचरा या ठिकाणी पसरला आहे. परंतु त्याची उचल करण्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे वाऱयाने कचरा उडून येणाजाणाऱया वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कचऱयांची उचल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ अशी काहीशी परिस्थिती ओव्हरब्रिजची झाली. ब्रिजच्या निर्मितीपासूनच या ना त्या कारणाने हा ब्रिज वादाचा मुद्दा ठरला आहे. ब्रिजच्या दर्जाबाबतही वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. उद्घाटनानंतर काही दिवसात या ब्रिजवरील पथदीपही बंद होते. अनेकदा तक्रारी केल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले होते.
मागील महिन्यात केंद्रीय मंत्री येणार असल्याने या ब्रिजची स्वच्छता करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे फूटपाथच्या शेजारी कचऱयाचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे हा कचरा उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.