अटकेतील जोडप्याची पोलिसांकडे कबुली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील ओसवालनगर येथे वेश्या व्यवसायप्रकरणी अटक करण्यात आलेले जोडपे मागील 6 महिन्यांपासून वैश्या व्यवसाय चालवत होत़े यासाठी मुंबई येथून युवती आणल्याची कबुली त्यांनी पोलिसांच्या चौकशीमध्ये दिल़ी पदमिणबाई तुकाराम बादलवाड (43, टेंभूर्णी-सोलापूर), शिवाजी आनंदराव पाटील (58, कऱहाड सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ दोन्ही संशयितांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल़ी
ओसवालनगर येथे 29 वर्षीय तरूणीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय चालवल्याचा आरोप या जोडप्यावर ठेवण्यात आला आह़े ही पीडित तरूणी धारावी-मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आह़े रत्नागिरीमधील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱया ओसवालनगर येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी पोलिसांकडे दिली होत़ी त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नजर ठेवण्यात आली होती. गुरूवारी या ठिकाणी बनावट गिऱहाईक बनून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रत्यक्ष कारवाई केली व छापा टाकल़ा यावेळी संशयित जोडपे तरूणीकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा प्रकार उघडकीस आल़ा हे तथाकथित जोडपे ओसवाननगर येथे रो बंगलो भाडय़ाने घेवून वास्तव्य करत होत़े आपली नेहमीची गिऱहाईके असलेल्या लोकांनाच येथे मुली पुरविण्याचे काम या जोडप्याकडून होत होत़े मागील 6 महिन्यांपासून येथे मुंबईतून मुली आणल्या जात होत्या, अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये समोर आली आह़े
केवळ 500 रूपयांसाठी देहव्यापार
वेश्या व्यवसाय प्रकरणातील तरूणीने आपली हकिगत पोलिसांसमोर उघड केली आह़े संशयित जोडप्याने आपल्याला देहव्यवसाय करण्यासाठी रत्नागिरी येथे आणले होत़े ते एका कस्टमरचे 500 रूपये आपल्याला देऊन इतर रक्कम स्वतःजवळ ठेवत, अशी माहिती या तरूणीने दिल़ी