गोकुळ शिरगाव/ वार्ताहर
करवीर पूर्व भागामध्ये औद्योगिक वसाहत असल्याकारणाने या भागातील कणेरी, कणेरीवाडी नेरली, तामगाव. उजळाईवाडी ,सांगवडे, हलसवडे . गोकुळ शिरगाव या गावांना आज रोजी केएमटी ची गरज असून लवकरात लवकर या भागात केएमटी चालू करण्याची गरज असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे, गेल्या सात महिन्यांपासून या भागातल्या केएमटी बंद बंद आहेत . अनलॉक झाल्यानंतर हळू सर्व बाजारपेठा चालू झालेल्या आहेत .
यामध्ये खास करून ग्रामीण भागात राहणारे लोक व औद्योगिक वसाहतींमधील कर्मचारीवर्ग शिवाय कणेरी. कोगील खुर्द या भागातून भाजीपाला शहरात विक्रीसाठी घेऊन जाणारे लोक यांना आज केएमटीचे अत्यंत गरज आहे. प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल असेल अशी सध्या वस्तू वस्तुस्थिती नाही .या कारणाने या भागातील नागरिकांना आज केएमटी चालू होणे गरजेचे आहे. या भागातील लोक दीपावलीच्या खरेदीसाठी गांधिनगर . महाद्वार रोड. राजारामपुरी व इतर शहर परिसरात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण केएमटी बस उपलब्ध नसल्याने यांचे हाल होत आहेत . त्यामुळे या भागात लवकरात लवकर के एम टी चालू व्हावी अशी मागणी इथले सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत.