प्रतिनिधी / कोल्हापूर
औरंगजेबासारख्या ज्या बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून पूरपणे मारले, अशा बादशहाचे नाव महाराष्ट्रातील एका मोठ्या शहराला असावे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे अतिशय योग्य आहे. सर्व शिवभक्तांच्या भावनेचा आणि अस्मितेचा विचार करून राज्य सरकारने तातडीने औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे करावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका व्ट्टिव्दारे केली आहे.