- 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अशंत: लॉकडाऊन
ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच औरंगाबादमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाण आढळून येत असल्याने, स्थानिक प्रशासनाने आता कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशंत: लॉकडाऊन असणार आहे. तर, प्रत्येक शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी हा देखील इशारा दिला की, अंशत: लॉकडाऊनच्या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याशिवाय खासगी व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक 15 दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र देखील सर्वांनी सोबत बाळगणे आवश्यक राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तर, या अंशत: लॉकडाऊनच्या कालावधीत धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलंतरण तलाव, शाळा-महाविद्यालयं संपूर्ण बंद असतील. विशेषकरून मंगलाकार्यालये, सभागृह यामध्ये होणाऱ्या विवाह समारंभांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तर, शनिवारी व रविवारी केवळ वैद्यकीय सेवा, माध्यम कार्यालय, दूध विक्री, भाजीपाला,फळविक्री सुरू असणार आहे.