आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी परीक्षा
प्रतिनिधी/ सातारा
राज्यात आज आरोग्य विभागाच्या विविध पदाची परीक्षा होती. त्या परीक्षेकरता सातारा जिह्यातील काही परीक्षार्थी औरंगाबाद जिह्यात परीक्षा देण्यासाठी गेले होते. तेथे परीक्षा केंद्रावर दुपारी दीडचा पेपर तब्बल एक तासांनी उशीरा पोहचल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तर सातारा जिह्यात ही परीक्षा शांततेंत पार पडली. मात्र, या परीक्षेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलेली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने विविध पदासाठी परीक्षा घेण्यासाठी एका खासगी संस्थेकडे काम सोपवण्यात आले होते. राज्यातील प्रत्येक जिह्यात ही परीक्षा होती. साताऱयातील काहींनी औरंगाबाद जिह्यात अर्ज केला होता. त्याकरीता औरंगाबाद येथे परीक्षेला गेला होते. परंतु परीक्षेला वेळेवर पेपर न आल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. तब्बल एका तासाने पेपर आल्याने परीक्षा सुरळीत पार पाडल्याचे सातारा जिह्यातील परीक्षार्थीनी सांगितले. दरम्यान, सातारा जिह्यात तीन परीक्षा केंद्रांवर 1200 विद्यार्थी नोंदवले गेले होते. त्यातील 900 विद्यार्थी गैरहजर राहिले. 300 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना विचारली असता त्यांनी फोनच स्वीकारला नाही.