ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना आता औरंगाबादेत ‘सारी’ या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या आजाराचे औरंगाबादेत आतापर्यंत 97 रुग्ण आढळले असून,
येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसीएच) ‘सारी’ आजाराने 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू 29 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान झाले आहेत. अजून 23 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन डोईबाले यांनी दिली.
‘सिव्हिअर ॲक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ असे या आजाराचे नाव असून, त्याची लक्षणे कोरोनासारखी आहेत. सर्दी, ताप, छातीत दुखणे, अशक्तपणा, न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास ‘सारी’ आजारात जाणवतो.
औरंगाबादेत ज्या 11 लोकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्या लोकांचा ‘सारी’ या आजाराने बळी घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंग पाळून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.