ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी तीन हजारचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी रुग्णांच्या संख्येत 96 ने वाढ झाली. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3028 वर पोहोचली आहे. यापैकी 1658 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती बुधवारी प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 3028 रुग्णांपैकी आत्तापर्यंत 165 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1207 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले.