ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात आज सकाळी 40 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये शहरातील 22 तर ग्रामीण भागातील 18 जण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12 हजार 711 वर पोहोचली आहे.
मनपा हद्दीतील रुग्णांमध्ये मुकुंदवाडी 1, जालाननगर 4, अंबिकानगर गल्ली नंबर 8, मुकुंदवाडी 1, निशांत बाग परिसर 1, एम जी एम परिसर 2, हर्सूल 1, मारोतीनगर सिडको एन सहा येथील 1, बापूनगर खोकडपुरा 1, कोकण वाडी 2, जवाहर कॉलनी 1, एन आठ सिडको 1, नारेगाव 2, म्हाडा कॉलनी 3 आणि शिवाजीनगर मधील एकाचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये सिडको वाळूज महानगर 1, राजीव गांधीनगर, खुलताबाद 1, लाडगाव रोड, वैजापूर 8, हिंगोली वैजापूर 1, घायगाव वैजापूर 1, निवारा नगरी, वैजापूर 1, साईनाथ कॉलनी, वैजापूर 1, चिंचडगाव, वैजापूर 1, मुळे गल्ली 1, बैलगाव, वैजापूर 1 आणि दर्गा नगर, वैजापूर मधील एकाचा समावेश आहे.
सध्या, जिल्ह्यात 4526 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत आढळलेल्या एकूण 12711 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 7, 753 रुग्णांची प्रकृती सुधारली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 432 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.