नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये विरोधाला सामोरे जावे लागल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा उडवाउडवीची भाषा वापरली आहे. “मला कोणीही माफी मागायला सांगितले नाही आणि मी कोणाचीही माफी मागितली नाही,’ असे वक्तव्य तिने शनिवारी केले. आपले वक्तव्य तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. कंगना राणावतला शुक्रवारी पंजाबमध्ये जमावाने रोखत माफीची मागणी केली होती. हिमाचलमधून पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱयांनी कंगनाला घेराव घालत रोखले होते. त्यानंतर शेतकऱयांच्या आंदोलनाबाबत केलेल्या त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगण्यात आल्यानंतर तिने माफी मागितल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित महिलांनी दिली होती. शेतकऱयांना खलिस्तानी दहशतवादी संबोधल्याचा आरोप कंगनावर होत असल्याने तिला शेतकऱयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.