तब्बल 27 लाखांचा निधी मंजूर : कामगारांतून समाधान
बेळगाव : गरिबांचा आर्थिक स्तर उंचावावा या हेतूने सुरू केलेल्या रोहयो योजनेंतर्गत कंग्राळी खुर्दमध्ये तब्बल 27 लाख रुपयांच्या कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ग्रा.पं.ने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे रोजगार कामगारांतून समाधान व्यक्त होत आहे.
मागील वर्षभरात कंग्राळी खुर्द हद्दीत काम मिळाले नसल्याने व्हीटीयू परिसरात रोजगारासाठी जावे लागत होते. त्यामुळे कामगारांनी ग्रा.पं.कडे गावातच काम उपलब्ध करून द्या, अशी मागणी लावून धरली होती. दरम्यान, ग्रा.पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, पीडीओ जी. आय. बर्गी, सदस्य चेतक कांबळे यासह सदस्यांनी अधिकाऱयांची भेट घेतली. यामुळे रोजगार गावातच उपलब्ध झाला आहे.
मार्कंडेय नदीजवळील पाण्याचा मार्ग खुला करण्यासाठी अर्धा कि.मी. लांबी आणि 15 फूट रुंदीचा मार्ग तसेच सहय़ाद्रीनगरपासून शेतवडीत 375 मी. लांबीचा रस्ता होणार आहे. यासाठी 27 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. यावेळी चेतक कांबळे यांनी गावातच काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपाध्यक्षा ज्योती पाटील, सदस्या कमला पाटील, लता पाटील, मीना मुतगेकर, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, कल्लाप्पा पाटील, यशोधन तुळसकर, प्रशांत पाटील यासह सुधा गौडर व रोजगार कामगार उपस्थित होते.
गावातच रोजगार देण्यासाठी धडपड
मागील महिन्याभरापासून गावातच काम मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. याला यश आले आहे. यापुढे गावातच रोजगार देण्यासाठी धडपड सुरू होणार आहे. वनखात्याच्या अखत्यारित येणाऱया मच्छे येथील क्षेत्रात काम मिळावे यासाठी वनखात्याकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
– यल्लाप्पा पाटील (ग्रा. पं. अध्यक्ष)