वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
दुर्गामाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा भक्तिमय व शिवमय जयघोषात घटस्थापनेपासून गेले नऊ दिवस सुरू असलेल्या दुर्गामाता दौडची मंगळवारी श्री कलमेश्वर मंदिर आवारात उत्साहात सांगता करण्यात आली.
शेवटच्या दिवशीची पूजा ऍड. सुधीर चव्हाण, ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, उमेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
गेले नऊ दिवस कंग्राळी बुद्रुक किर्यात भागात दररोज दौड फिरवून वातावरण शिवमय केले. शेवटच्या दिवशीची दौड चव्हाट गल्ली, मसणाई गल्ली, बाहेर गल्ली, लक्ष्मी गल्ली, नेताजी गल्ली, श्री कलमेश्वर गल्ली, आदी गल्लीमधून दौड निघाली. कलमेश्वर गल्लीत कमानी उभे करून खास सजावट केल्याने ही सजावट सर्वांचे आकर्षण वेधून घेत होती. तसेच विविध महिला मंडळांनी एकाच रंगाच्या साडय़ा परिधान केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दौडची सांगताप्रसंगी उपस्थित शिवप्रेमी धारकऱयांनी शिवप्रतिष्ठानचे संदीप पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आदर्श डोळय़ासमोर ठेऊन आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा सल्ला दिला. यावेळी आदित्य पाटील (शाहूनगर) यांनीही हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी धारकऱयांची कोणती महत्त्वाची भूमिका आहे हे सांगितले. दुर्गामाता दौड यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान कंग्राळी बुद्रुक शाखेचे शिवप्रेमी धारकरीसह युवक, बालचमू व इतरांनी विशेष परिश्रम घेतले. नऊ दिवस चाललेल्या दौडचे समालोचन प्रशांत पवार व बसवंत पाटील यांनी केले.