वाहून जाणारे पाणी बंद करून तलाव अबाधित ठेवण्याची निलजी ग्रामस्थांची मागणी
वार्ताहर /सांबरा
निलजी महामार्गालगत असलेल्या कंचवीर तलावातील पाणी वाहून वाया जात असल्याने चक्क पावसाळय़ात तलाव रिकामा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वाहून जाणारे पाणी संबंधित कंत्राटदाराने वेळीच बंद करून तलाव अबाधित ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
दोन वर्षापासून आमदार फंडातून सुरू असलेले कंचवीर तलावाचे विकासकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. तलावाचे काम निविदेप्रमाणे केले नसून कामात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. काम अर्धवट सोडून बिल हडप केल्याचा आरोपही संबंधित कंत्राटदारावर होत आहे.
पाईपला व्हॉल्व्ह नसल्याने समस्या
तलावाचे काम अर्धवट सोडल्याने अनावश्यक किंवा जादा भरलेले पाणी बाहेर जाण्यासाठी घालण्यात आलेल्या पाईपला व्हॉल्व्ह बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे तलावातील सर्व पाणी बाहेर जाऊन शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.
नुकसानीला कंत्राटदार जबाबदार या नुकसानीला संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. वाहून जाणारे पाणी बंद न झाल्यास ऐन पावसाळय़ात तलाव रिकामा होण्याची दाट शक्मयता दिसून येत आहे. तसे झाल्यास पाण्याअभावी गावकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायतीच्या अधिकाऱयांनीही दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.