प्रतिनिधी / सातारा :
कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने आरोग्य विभागात एनएचएम अंतर्गंत 700 च्या वर कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांना शासनाने सेवामुक्त केले असले तरी सातारा जिल्हय़ातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता त्यांची सेवा सुरु ठेवावी, अशा शिफराशीचे पत्र खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना दिले आहे.
सातारा जिल्हय़ात कोरोना स्थिती भंयकर झाल्यानंतर आरोग्य विभागात विविध विभागात एनएचएम अंतर्गंत कंत्राटी कोविड कर्मचारी भरण्यात आले. दीड वर्षांनंतर या कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता सेवामुक्त करुन त्यांच्यावर राज्य शासनाने अन्याय केला आहे. या कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे असे खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रात म्हटले आहे.