अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बग्ल्यासमोर धरणे सरकारला इशारा
प्रतिनिधी / पणजी
गेली कित्येक वर्षे तुटपुंजा पगारावर विविध विद्यालयामध्ये कायमस्वरुपी शिक्षकांच्या बरोबरीने काम करणाऱया कंत्राटी शिक्षकांचा एक महिन्याच्या आत प्रश्न सोडवा. अन्यथा अल्तीनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बग्ल्यासमोर धरणे धरणार. असा इशा कंत्राटी शिक्षकांनी दिला आहे.
किमान सध्या जितके काम तितका पगार द्या. नंतर सर्व सोपस्कर पूर्ण करून नोकरीत कायम करा. काम कयम स्वरूपी शिक्षकांच्या बरोबरीने पगार व्यवस्थित नाही. कसल्या सुविधांचाही लाभ घेता येत नाही ही वागणूक गेल्या 11 वर्षापासून आम्हाला मिळत आहे. आमच्यावरच हा अन्याय का असा प्रश्न कंत्राटी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
येथील आझाद मैदानावर मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर कंत्राटी शिक्षक गंगाराम लामबार बोलत होते. तेव्हा त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी त्यांच्या सोबत दिपाली परब, वासू देसाई व इतर कंत्राटी शिक्षक उपस्थित होते.
दिवसेंन दिवस महागाई वाढत आहे. एका शिक्षकाला हवी असलेली शैक्षणिक पात्रता आमच्याकडे असतानाही आम्ही 16 हजार रुपयांवर काम करीत आहोत. या उलट कायम स्वरुपी शिक्षक 50 ते 60 हजार रुपये प्रती महिना पगार घेत आहेत. आम्ही एकूण 54 कंत्राटी शिक्षक आहोत. ज्याज्या विद्यालयांमध्ये आमची नियुक्ती केली आहे त्या विद्यालयामध्ये शिक्षकांच्या बरोबरीने काम करीत आहोत किंबहुना कायमस्वरुपी शिक्षकाहुन अधिक काम करतो. मग वेतेन देताना आमच्यावरच अन्याय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेही आमचा विषय मांडला होता, त्यांनी वेतनात 22 हजार रुपये पर्यंत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप काहीही झालेले नाही. आता दोन महिने विद्यालयांना सुट्टी असल्याने दोन महिन्याचा पगारही आम्हाला मिळणार नाही. अशा स्थितीत आम्ही करायचे तरी काय अशा प्रश्न त्यांनी उस्थित केला आहे.
केंद्र सरकारच्या योजने अर्तंगत 2011 सालात एकूण 54 प्रशिक्षित शिंक्षकांना कंत्राटी पध्दतीवर नोकरीत रुजू करून घेतले होते. इतर काही राज्यात अशाच प्रकारे घेतलेल्या शिक्षकांना नोकरीत कायम करण्यात आले मात्र गोवा सरकारने आम्हालाच अद्या लडकवीत ठेवले आहे.